Wednesday, March 31, 2010

"एक तरी झाड असे लावावे शहाणे!"

लहानपणी मला पुण्याबद्दल नेहेमीच आकर्षण वाटायचे.शिवाय इतिहासाच्या पुस्तकात बाल शिवाजी आणि जिजाबाई यांनी पुण्यात स्वराज्याचा पाया कसा घातला, पुण्याच्या आसपासचे गड कसे जिंकले, नवीन कसे बांधले, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत गनिमी कावे कसे शिकले, एवढा मोठा शत्रू, मुघल, त्यांना कसे नमवले अश्या अनेक गोष्टीनी पुण्याबाद्दल्ची उत्सुकता वाढली होती. पाचवी मध्ये असताना पुण्यात सहलीला यायचा योग आला. तेव्हा लाल महाल, शनिवार वाडा, सारस बाग, केळकर संग्रहालय, अप्पू घर सगळं पाहून खूप मजा आली होती.
मावशी पुण्यात राहायला होती. सुट्टीत एखादी चक्कर तिच्या घरी व्हायची. मग पुण्यात एवढ्या पेठ कशा काय तयार केल्या असतील असे कुतूहल वाटत राहायचे. इथल्या लोकांची बोलायची ढब पण थोडी वेगळीच :)
मग १२ वी नंतर engineering college मध्ये admission घेऊन एकदाची मी पुण्यात आले :) तेव्हा पुणं एवढा गजबजलेला नव्हतं. रस्त्यांवर ओथंबून वाहणारी गर्दी नव्हती. रिटायर लोकांचे विश्राम स्थान, विद्येचे माहेर घर आणि थंड हवेच गाव म्हणून अजूनही पुण्याची ख्याती होती. हळू हळू आमच्या सारखी लोकं शिक्षण/नोकरीच्या निमित्तानं पुण्यात आले आणि इथेच स्थायिक झाले.बरयाच आय. टी. कंपन्यांनी आपापली पाळे मुळे रुजवली. लोकांना अजून नोकर्या मिळू लागल्या. मग हळू हळू इतर उद्योग धंदे पण जोर धरू लागले आणि पुणे हे औद्योगिक नागरी बनायला लागली. पुण्यात वेगवेगळ्या कारणांसाठी लोकं घरे बंधू लागली. कुणाची नोकरी इथेच म्हणून. कुणी वीकेंड होम म्हणून.कुणी INVESTMENT म्हणून.पुण्याचा विस्तार वाढायला लागला. रस्त्यांवरची गर्दी वाढली. मग मोठे रस्ते पाहिजेत, राहायला जागा पाहिजे म्हणून हळू हळू झाडे जमीनदोस्त होऊ लागली. वाहनांची वाढती संख्या प्रदूषणात भर पडू लागली. बांधकाम व्यावसायिकांचे तर चांगलेच फावले. जागा मिळेल तिथे इमारती उभ्या व्हायला लागल्या. अर्थातच तिथलीही झाडं कापून त्या जागा NA केल्या असणारच.आता गावातली जागा कमी पडते म्हणून गावाभोवतली असणाऱ्या सुंदर टेकड्या पोखरल्या जात आहेत. मुंबई -बंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नजर टाकली तर याची पावती मिळेल. बघावे तिकडे इमारतीच इमारती. गाड्याच गाड्या, माणसेच माणसे !!एवढी झाडं तोडून, प्रदूषण करून तापमान वाढेल नाही तर काय? थंड थंड म्हणता म्हणता पुण्याचा पारा उन्हाळ्यात ४०- ४२ वर कसा जातो हे AC मध्ये बसून कसे कळणार?

अशी अवस्था होणारे हे पहिलेच शहर नाही. ज्या ज्या गावाचे शहरीकरण/औद्योगिकीकरण होते ते याच अवस्थांमधून जात असणार.

निवांत जगणारं पुणं घड्याळाच्या काट्यांवर केव्हा पाळायला लागलं हे त्यालाही कळलं नसेल. पोटाची खळगी भरणारी माणसं जेव्हा खिसे आणि तिजोर्या भरायला लागतात तेव्हा स्वार्थी होतात. आणि हाच स्वार्थ विनाश ओढवून घेणारा असतो. हे सगळं कुठे थांबणार याची कुणालाच काळजी नाही. आला दिवस गेला असे आपण जगत असतो. मी सुदधा याच प्रक्रियेचा घटक आहे. आपण सर्वच आहोत. मग आपणच हे सर्व सुधारायला नको का?

"झाड़े लावल तर वाचाल!" हि आजची गरज झाली आहे. झाडांचे महत्व मी वेगळे संगायला नको.
प्रत्येकाने जाणीव पुर्वक एक तरी मोठे झाड आणि शक्य तितकी रोपे लावली तर आपले शहर सुन्दर तर होइलच पण पर्यावरणाची झीज काही अंशी तरी भरून निघेल.झाडे लावणे हा रिकामटेकडा उद्योग आहे असे मानून डोळे झाकून दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळात वेळ काढून एखादे रोप फुलवून तर पाहू!!

मी कुठेतरी वाचले होते:
"We have not INHERITED this Earth, We have BORROWED it from our future generations!!"
किती खरं आहे ! जे चांगलं आयुष्य/ पर्यावरण आपल्याला मिळालं आहे त्यापेक्षा भर भरून आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळाले पाहिजे!.

पुण्याच्या घरा घरा भोवती, रस्त्यांच्या कडेला, नद्याच्या काठी, टेकड्या वर् ,सुन्दर झाडी, फुल झाडी असलेला चित्र प्रत्येकाच्या मनात असेल तर का नाही हे शक्य होणार? निसर्गाकडून भरभरून घेताना त्याला थोडंसं परत दिल्याचा समाधान तरी मिळेल. पुण्याबद्दल लिहिते आहे कारण सध्या मी इथे राहते, जगते . हि जाणीव मला इथेच झाली. प्रत्यक्षात आपण असू तिथे आपण हे निसर्गाचे देणे फेडले पाहिजे.खुप गोष्टि करता येतिल. एका झाड़ाने सुरु करु या?

"फिटावे हे जरा तरी जगण्याचे देणे,
एक तरी झाड असे लावावे शहाणे! "


निसर्ग प्रेमींसाठी छोटीशी भेट :
१) In India, One Man Creates a Forest
http://forests.org/archive/asia/indfor.htm
२) The man who planted trees!!!
http://home.infomaniak.ch/arboretum/Man_Tree.htm
३) Green Hills Group!!
http://www.greenhillsgroup.org/index.html

2 comments:

  1. खरच शहाणा करणारा लेख .. तू म्हणतेस ते एकदम पटले.. पोटाची खळगी भरणारी माणसं जेव्हा खिसे आणि तिजोर्या भरायला लागतात तेव्हा स्वार्थी होतात... आणि मग काही गोष्टी डोळेझाक करता करता जाणिवा हरवून बसतात..
    फुलपाखरू जसे पराग कण आपल्या पायाना चिकटवून घेवुन नकळत स्वप्न रुजवत फिरत असते.. प्रगल्भ आणि विचारवंत माणसाला ते जमुच शकते की मग... :) खरच जमेल तसे सारे जाणीव पूर्वक ते करायला हवे... Lets dream and act for green earth again..

    ReplyDelete
  2. Heyyyy kharach khup chan ahe lekh.... asach ekhada lekh traffic war pan lihi na ...ani tuzya saglya collegues, frnds ani relatives barobar share kar... I hope this will help getting traffic better atleast a bit... :)

    ReplyDelete